Advertisement

Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board chapter 1 - वीरांना सलामी [Latest edition].

विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita


विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita


विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita


विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita


विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita


विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita


विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita


विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita

Chapter 1: वीरांना सलामी

विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita

कृती (१) [PAGE 25]

Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Chapter 1 वीरांना सलामी कृती (१) [Page 25]

कृती (१) | Q 1.1 | Page 25

काव्यसौंदर्य.


दृक्-श्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणज


ANSWER:


(१) दुर्दम्य आशावाद

(२) असामान्य कर्तृत्व

(३) प्रखर राष्ट्रनिष्ठा

(४) अदम्य साहस

कृती (१) | Q 1.2 | Page 25

काव्यसौंदर्य.


कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्ये


ANSWER:


(१) शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या मूल्यांना यथोचित न्याय देणे.

(२) सैन्यदलातील वीरांचे भाट होऊन त्यांची कवने गाणे.

(३) पुढील ५ वर्षे नागरिकांना इथे आणून वीरांना सलामी देणे.

(४) पन्नाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे.

कृती (१) | Q 1.3 | Page 25

काव्यसौंदर्य.


लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट


ANSWER:


(१) आत्मकेंद्री

(२) संकुचित

कृती (१) | Q 1.4 | Page 25

काव्यसौंदर्य.


लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट


ANSWER:


(१) कामकरी मुंग्यासारखे झपाझप काम करणे.

(२) उमदा, प्रसन्न चेहरा.

(३) सतत कामात.

(४) कमालीची आतिथ्यशीलता.

विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita

कृती (१) | Q 2.1 | Page 25

चौकटीत उत्तरे लिहा.


तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक __________________


ANSWER:


तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक ऑपरेशन विजय

कृती (१) | Q 2.2 | Page 25

चौकटीत उत्तरे लिहा.


भयाण पर्वतांवर चढणार __________________


ANSWER:


भयाण पर्वतांवर चढणार आमचे धैर्यधर सैनिक

कृती (१) | Q 2.3 | Page 25

चौकटीत उत्तरे लिहा.


मृत्यूलाच आव्हान देणारी __________________


ANSWER:


मृत्यूलाच आव्हान देणारी २२-२३ वर्षांचे तेजस्वी तरुण

कृती (१) | Q 2.4 | Page 25

चौकटीत उत्तरे लिहा.


कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी __________________


ANSWER:


कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी ड्रायव्हर स्टानझिन

कृती (१) | Q 2.5 | Page 25

चौकटीत उत्तरे लिहा.


चोवीस जणांची लडाख भेट __________________


ANSWER:


चोवीस जणांची लडाख भेट मिशन लडाख

कृती (१) | Q 3.1 | Page 25

कारणे लिहा.


थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’च्या स्मारकाला सलाम केला, कारण...


ANSWER:


थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी 'ऑपरेशन विजय यांच्या स्मारकाला सलाम केला; कारण ते स्मारक होते हुतात्मा झालेल्या २२-२३ वर्षांच्या कोवळ्या तरुणांचे!

कृती (१) | Q 3.2 | Page 25

कारणे लिहा.


‘मिशन लडाख’ साठी ‘राखी पौर्णिमे’चा मुहूर्तनिवडला, कारण...


ANSWER:


'मिशन लडाख 'साठी 'राखी पौर्णिमे 'चा मुहूर्त निवडला; कारण आपल्या रक्षणकर्त्या प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले, तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल, असे लेखिकांना वाटत होते.

कृती (१) | Q 3.3 | Page 25

कारणे लिहा.


लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण...


ANSWER:


लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं; कारण लष्कर म्हटले की रुक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते.

कृती (१) | Q 3.4 | Page 25

कारणे लिहा.


समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण...


ANSWER:


समाजात होत जाणाऱ्या बदलाबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते; कारण समाजात वाढलेल्या उथळपणामुळे नवीन तरुणांमधून खरा सैनिक घडवणे जिकिरीचे बनले होते.

कृती (१) | Q 4.1 | Page 25

पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.


एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.


ANSWER:


आपली माणसे, आपला गाव सोडून सैनिक हजारो मैल दूर वर्षानुवर्षे राहतात. आपली माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी वागताना मिळणारा भावभावनांचा गोड अनुभव त्यांना मिळत नाही. म्हणून लेखिका व त्यांच्या सोबती यांचा अल्पसा सहवासही त्यांना सुखद वाटतो.

कृती (१) | Q 4.2 | Page 25

पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.


‘सेवा परमो धर्म:’


ANSWER:


लेखिका कारगिल-द्वास येथून परतत असताना घडलेला प्रसंग आहे हा – रात्रीचे साडेदहा वाजले होते. मिट्ट काळोख पसरला होता. खल्सेचा पूल कोसळला होता. मागे-पुढे कुठेही जाण्याची सोय नव्हती. कर्नलना फोन लावला. विशेष म्हणजे ते फोनची वाटच पाहत होते. कर्नल लष्करी अधिकारी. कार्यव्यग्र. पण तशातही त्यांनी आठवण ठेवून लेखिकांसहित सर्व ३४ जणांची खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले. सेवावृत्ती असल्याशिवाय इतका प्रतिसाद मिळालाच नसता.

कृती (१) | Q 4.3 | Page 25

पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.


गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.


ANSWER:


लडाखच्या दऱ्याखोऱ्यात, मिट्ट काळोखी रात्र. पावसामुळे जमिनीवरून पाण्याचे ओहोळ वाहत होते. खल्सेचा पूल कोसळला होता. काळजाचे पाणी पाणी करणारा प्रसंग! अशातच लेखिकांनी कर्नल राणा यांना फोन केला, तेव्हा त्यांचा आशादायक, दिलासादायक स्वर लेखिकांच्या कानांवर पडला. त्यांनी सर्व व्यवस्था आधीच केली होती. लेखिकांचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे, आनंदाचे अश्रू येऊ लागले.

कृती (१) | Q 4.4 | Page 25

पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.


लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.


ANSWER:


लष्कराबद्दल सर्वसाधारण नागरिकांत गैरसमज फार असतात. लष्करातील जीवन अत्यंत खडतर असते. तेथे सुखकारक काहीच नसते. संपूर्णपणे बंदिस्त जीवन असते. सतत घरादारापासून दूर राहावे लागते. म्हणून बुद्धिमान तरुण लष्कराकडे वळत नाहीत. मुली सैनिकांशी लग्न करण्यास राजी नसतात. एक प्रकारे लष्कर आणि सामान्य जनता यांच्यात फार मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी भरून काढण्याचे व दोन्ही बाजूंमध्ये संवाद निर्माण करण्याचे कार्य लेखिका त्यांच्या उपक्रमांद्वारे करीत होत्या.

कृती (२) [PAGES 25 - 26]

Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Chapter 1 वीरांना सलामी कृती (२) [Pages 25 - 26]

कृती (२) | Q 1.1 | Page 25

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.


जमीन अस्मानाचा फरक असणे.


ANSWER:


अर्थ - खूप तफावत असणे.

वाक्य - सुशिला समंजस व सुनिला हेकट आहे. दोघींच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे.

कृती (२) | Q 1.2 | Page 25

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.


अंगावर काटा येणे.


ANSWER:


अर्थ - तीव्र मारा करणे.

वाक्य - भारतीय जवानांनी शत्रूवर तोफांतून आग ओकली.

कृती (२) | Q 1.3 | Page 25

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.


आग ओकणे.


ANSWER:


अर्थ - भीतीने अंगावर शहारा येणे.

वाक्य - जंगलातून जाताना अचानक समोर वाघ पाहून प्रवाशांच्या अंगावर काटा आला.

कृती (२) | Q 1.4 | Page 25

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.


मनातील मळभ दूर होणे.


ANSWER:


अर्थ – गैरसमज दूर होणे.

वाक्य - मनीषा पटेल असा त्याच्या वागण्याचा खुलासा केल्यानंतर सुदेशच्या मनातील मळभ दूर झाले.

विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita

कृती (२) | Q 2 | Page 26

खालील तक्ता पूर्ण करा.



क्र.

वाक्य

वाक्यप्रकार

बदलासाठी सूचना

(१)

जमेल का हे सारं आपल्याला?

______

विधानार्थी करा

(२)

तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात.

______

उद्गारार्थी करा

(३)

यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता.

______

प्रश्नार्थक करा

(४)

पुढील सगळे मार्ग बंदच होते.

______

नकारार्थी करा


ANSWER:



क्र.

वाक्य

वाक्यप्रकार

विधानार्थी – हे सारं आपल्याला जमेल.

(१)

जमेल का हे सारं आपल्याला?

प्रश्नार्थी वाक्य

उद्गारार्थी - किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल!

(२)

तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात.

विधानार्थी वाक्य

प्रश्नार्थक - यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का?

(३)

यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता.

नकारार्थी वाक्य

नकारार्थी - पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते.

(४)

पुढील सगळे मार्ग बंदच होते.

होकारार्थी वाक्य

विधानार्थी – हे सारं आपल्याला जमेल.


विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita

कृती (२) | Q 3 | Page 26

खालील तक्ता पूर्ण करा.



क्र.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

बावीसतेवीस

 

 

(२)

ठायीठायी

 

 

(३)

शब्दकोश

 

 

(४)

यथोचित

 

 


ANSWER:



क्र.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

बावीसतेवीस

बावीस किंवा तेवीस

वैकल्पिक द्वंद्व

(२)

ठायीठायी

प्रत्येक ठिकाणी

अव्ययीभाव

(३)

शब्दकोश

शब्दांचा कोश

विभक्ती तत्पुरुष

(४)

यथोचित

उचित (योग्यते) प्रमाणे

अव्ययीभाव


कृती (२) | Q 4.1 | Page 26

योग्य पर्याय निवडा व लिहा.


तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग-


भावे प्रयोग


कर्तरी प्रयोग


कर्मणी प्रयोग


ANSWER:


तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग- कर्तरी प्रयोग

कृती (२) | Q 4.2 | Page 26

योग्य पर्याय निवडा व लिहा.


त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग-


कर्तरी प्रयोग


भावे प्रयोग


कर्मणी प्रयोग


ANSWER:


त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग- भावे प्रयोग

कृती (२) | Q 4.3 | Page 26

योग्य पर्याय निवडा व लिहा.


पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य-


त्यांनी आम्हांला दृक्-श्राव्य दालनात नेले


भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच


आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता


ANSWER:


पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य - आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता

कृती (३) [PAGE 26]

Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Chapter 1 वीरांना सलामी कृती (३) [Page 26]

कृती (३) | Q 1 | Page 26

स्वमत.


‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो ।’ असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.


ANSWER:


जेव्हा जेव्हा देशावर शत्रूचे आक्रमण होते किंवा अतिरेक्यांचे हल्ले होतात, तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते. सैनिकांबद्दलचे प्रेम उफाळून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्याच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंनी लोक उपस्थित राहतात. एरव्ही सर्व नागरिक आपापल्या सुखात मशगुल असतात. देशावर प्रेम करायचे म्हणजे नाटक, सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे किंवा १५ ऑगस्ट – २६ जानेवारीला झेंडावंदन करायचे. शेवटी, मूठ वळलेला हात हवेत उंचावून 'भारतमाता की जय' असे जोरात म्हणायचे! हीच देशभक्ती! आपली देशभक्ती कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे.


वीरमरण आलेल्या सैनिकाच्या आईचे उद्गार सर्व देशवासीयांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. ती आई सर्वांना देशावर थोडे तरी प्रेम करा, असे विनवीत आहे. देशावर प्रेम करणे याचा खरा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे.


देशावर प्रेम करायचे म्हणजे देशाचे भले चिंतायचे, देशाचे ज्या ज्या गोष्टीत भले होते, त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी देशाला हानिकारक आहेत त्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. आता हेच बघा ना - काही काळापूर्वी कोरोनाचा कहर चालू झाला होता. लागलीच नाक-तोंड झाकायचा पाच रुपयांचा मास्क पंचवीस रुपयांना विकला जाऊ लागला. ताबडतोब काळाबाजार सुरू. काही समाजकंटक वापरलेले मास्क इस्त्री करून विकत होते. दुधात भेसळ, अन्नधान्यात भेसळ, भाज्या तर १५० २०० रुपयांना किलो अशा सुद्धा विकल्या गेल्या होत्या. लोक लाच घेतात. कामात घोटाळे करतात. कोणतेही काम प्रामाणिकपणे करीत नाहीत. त्यामुळे उत्पादने वाईट निर्माण होतात. सेवा चांगल्या मिळत नाहीत. हे सर्व देशाचेच नागरिक ना? असे केल्याने देशाची प्रगती कशी होईल?


सगळ्यांनी प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करणे ही देशभक्ती आहे. हेच देशावर प्रेम आहे. विद्यार्थ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच सचोटीने कामे केली तर देशाची प्रगती होईल.


कृती (३) | Q 2 | Page 26

स्वमत.


ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी, ते स्पष्ट करा.


ANSWER:


सर्व लोकांच्या मनात सेनादलांविषयी गैरसमज फार आहेत. परकीयांचे आक्रमण होते त्या वेळी सेनादलांबद्दल अफाट प्रेम आणि अभिमान उफाळून येतो. पण गैरसमज वितळून जात नाहीत.


सेनादलातील जीवन खूपच कष्टाचे असते. ते नियमांनी करकचून बांधलेले असते. त्यात वैविध्य नसते. म्हणून ते कंटाळवाणे असते. सेनादलांविषयीचा हा दृष्टिकोन वरवर पाहिले, तर बरोबर आहे, असे वाटेल. पण हे गैरसमज आहेत. अगदी घट्ट रुतून बसले आहेत.

मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करीत आणले की भविष्याचा विचार सुरू होतो. कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले MBBS, IIM, B.Tech, M.Tech, BE, ME या अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात. बाकीचे विद्यार्थी आपापल्या मगदुराप्रमाणे अभ्यासक्रम निवडतात. पण कोणीही अगदी कोणीही, 'मी सेनादलात जवान म्हणून जाईन, अधिकारी म्हणून जाईन,' असे म्हणत नाहीत. हे कशाला? मुलीच्या लग्नाच्या वेळी कोणीही सेनादलातील मुलांचा नवरा म्हणून विचार करीत नाही. यामागे खरे तर गैरसमज आहेत.


कष्ट काय फक्त सैन्यातच असतात. सध्या आयटीमधील मुले १२-१२, १५-१५ तास काम करतात. घरी आल्यावरही ऑफिसचे काम असतेच. हे काय कष्ट नाहीत? वास्तविक लष्करातील कष्टाची व शिस्तीची शिकवण मिळाली, तर माणूस जीवनातील कोणत्याही क्षेत्रात सहज यश मिळवू शकतो. तसेच, लष्करी जीवनात प्रचंड विविधता असते. किंबहुना लष्करातील थरारक अनुभव अन्यत्र कुठेच मिळू शकत नाही. शिवाय, लष्करात गेले की लढाई होणारच आणि आपण मरणारच असे थोडेच असते? नागरी जीवनात अपघाताने मृत्यू येत नाही? मुले आयुष्यभर कुटुंबापासून दूर राहतात, हेही पटण्यासारखे नाही. अलीकडे मुले अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असे किती तरी दूर दूर जातात. त्याचे काय?


सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लष्करात फक्त पाच वर्षे नोकरी केली की मुक्त होता येते. ही सोय इतरत्र असते का? लष्कराचे अत्यंत मूल्यवान प्रशिक्षण मिळाले, तर नंतर कुठेही चमकदार जीवन जगता येऊ शकते. पण हे कोणीतरी जिव्हाळ्याने समजावून सांगितले पाहिजे आणि हे काम लेखिका अनुराधा प्रभुदेसाई करू शकतात, असा विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटत होता.


कृती (३) | Q 3 | Page 26

स्वमत.


‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.


ANSWER:


कर्नल राणा लेखिकांशी अत्यंत आत्मीयतेने बोलले. त्यांच्या बोलण्यात रूक्षपणा, परकेपणा किंवा केवळ औपचारिकपणा नव्हता. त्यांच्या मनात सेनादलाविषयी विलक्षण कळकळ होती. ती कळकळ लेखक समजून घेऊ शकत होत्या. याचा कर्नल राणा यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्या मनात सैनिकी जीवनाविषयी ठाम धारणा होत्या. त्या धारणांना अनुसरून सैनिक घडवायला हवा, असे त्यांना मनोमन वाटत असे. तसा सैनिक घडवणे आता जिकिरीचे बनले होते. राणा यांना ही स्थिती तीव्रपणे जाणवत होती.


सध्याच्या तरुणांवर टीव्ही व सामाजिक माध्यमे यांचा फार मोठा प्रभाव आहे. टीव्हीवरील कार्यक्रम बहुतांश वेळा वास्तवापासून दूर गेलेले असतात. किंबहुना प्रेक्षकांना वास्तवापासून दूर नेणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. त्या कार्यक्रमांतील सामाजिक समस्या या वास्तव नसतात. त्या काल्पनिक असतात. एखाद्या कार्यक्रमातील कथानकात वास्तवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असतो, नाही असे नाही. पण ते वास्तव खूप सुलभ केलेले असते. त्यातले ताणतणाव अस्सल नसतात. ते सुलभीकृत असतात. त्यामुळे त्यातील चित्रणात, जीवनाच्या दर्शनात उथळपणा असतो. सैनिक घडण्यासाठी ज्या धारणांची आवश्यकता असते, त्या धारणा तरुणांना परिचयाच्या नसतात. त्यामुळे त्यांना सैनिक म्हणून घडवणे जिकिरीचे बनते. सेनादलातील वास्तव हे रोकडे, रांगडे असते. तर टीव्हीमुळे सैनिकांविषयी रोमँटिक कल्पना निर्माण केली गेलेली आहे. सेनादलाला रोमँटिकपणा, हळवेपणा चालत नाही. तेथे रोखठोक, कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते. हे नवीन तरुणांना जमत नाही.


नागरी जीवन व सैनिक जीवन यांच्यात अंतर पडलेले आहे. चांगला सैनिक होण्यासाठी हे अंतर दूर करणे आवश्यक आहे. तरच देशाला चांगला सैनिक मिळू शकतो. त्यासाठी आपण प्रथम सैनिक समजून घेतला पाहिजे. लेखिकांना कर्नल राणांकडून हा दृष्टिकोन मिळाला. या जाणिवेमुळे सैनिकातला माणूस समजून घेणे आपल्याला अधिक सोपे जाईल, असे लेखिकांना वाटले. ही भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी 'आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला,' असे विधान केले आहे.


कृती (४) [PAGE 27]

Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Chapter 1 वीरांना सलामी कृती (४) [Page 27]

कृती (४) | Q 1 | Page 27

अभिव्यक्ती.


सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा.


ANSWER:


सैनिकाला स्वत:चे जीवन हजारो मैल दूर अंतरावर, कुटुंबीयांपासून लांब राहून जगावे लागते. आपल्या माणसांत राहून, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत रोजचे जीवन जगता येत नाही. कष्टमय दैनंदिन जीवन त्याच्या वाट्याला येते. आरामदायी जीवन जवळजवळ नाही. दऱ्याखोऱ्यांतून, वाळवंटातून, जंगलांतून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते. तासन्तास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात. आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते. हे असे का? ते तसे नको. हे मला जमणार नाही, ते मी नंतर करीन, मला आता कंटाळा आला आहे, असे काहीही बोलता येत नाही. सैनिकाला संचारस्वातंत्र्य नसते. कुठेही जावे, कोणालाही भेटावे, काहीही करावे किंवा काहीही करू नये, असले कोणतेही स्वातंत्र्य सैनिकाला नसते. खरे तर अत्यंत खडतर, कष्टमय जीवन सैनिक जगत असतो.

याउलट, नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. नागरिक कुटुंबीयांसोबत राहतो. सुखदुःखाचे सगळे क्षण तो कुटुंबीयांसोबत अनुभवतो. त्याला कुटुंबीयांचा सहवास मिळतो. कुटुंबीयांना त्याचा सहवास मिळतो. नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते. तो कुठेही, कधीही, कोणाहीकडे जाऊ शकतो. कोणालाही भेटू शकतो; हवे ते करू शकतो. कोणत्याही प्रकारे तो मनोरंजन करून घेऊ शकतो. असे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याच्यासमोर एकच काम असते - देशाचे रक्षण करणे. त्यात तो हयगय करू शकत नाही. त्याच्या जीवावर आपण सुरक्षित आयुष्य जगतो. त्याच्या भरोवशावर आपण सण-उत्सव साजरे करू शकतो. आपण नेहमीच सैनिकाचे ऋणी राहिले पाहिजे.

 

कृती (४) | Q 2 | Page 27

अभिव्यक्ती.


कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है ।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.


ANSWER:


सिर्फ दिमाग में डालना है!' हा मंत्र मला खूप मोलाचा वाटतो. हा मंत्र मला खूप आवडला आहे. तो मी प्रत्यक्षात अमलात आणणारच आहे. मी काही वेळा असे केलेलेच आहे. फरक एवढाच की, त्या वेळी हा मंत्र मला ठाऊक नव्हता. मी धडाक्यात काही गोष्टी पार पाडल्या आहेत. मी दोन उदाहरणे सांगतो. त्यावरून मी काय करणार आहे, हे लक्षात येईलच.


गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे ही, मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू?, या प्रश्नावरच गाडी अडायची. एकदा मी झटक्यात ठरवले.. निबंध लिहायचाच. आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली दोन तीन वाक्ये लिहिल्यावर पुढे लिहिता येईना. विचार केला. तेव्हा लक्षात आले... माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय. मग मुद्दे लिहायला घेतले. सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. दोनतीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले. प्रत्येक मुद्द्याबाबत मी काय विवेचन करीन, याचा मागोवा घेतला. ... आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो. निबंध पूर्ण झाला. तो मी सरांना दाखवला. सरांनी 'उत्तम' असा शेरा देऊन शाबासकी दिली. मी खूश!


दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टीव्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणपूड मिसळली आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले. बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले. मला कसेसेच वाटले. मी इथे आरामात टीव्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाहीत, तेवढे कपडे ती धुणार! मनात आले... आपणच का धुवू नयेत? पण शंका आली... आपल्याला झेपेल? किती वेळ लागेल? हात दुखतील? पण तत्क्षणी विचार आला... आईला हे प्रश्न पडतात? ती कशी धुणार? ते काही नाही. मी ठरवून टाकले... आपणच धुवायचे. मी न्हाणीघरात गेलो. एकेक कपडा नीट पाहून, मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले. एकेक कपडा घेऊन हासळून घुसळून सर्व कपडे धुवून टाकले. माझे मलाच आश्चर्य वाटले.


हे मला कसे जमले? आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र 'सिर्फ दिमाग में डालना है!' आता मी ठरवून टाकले आहे... मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार... असे... दिमाग में डाल दे दूँगा! मला खात्री आहे मी यशस्वी होणारच.


HSC MARATHI

Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board chapter 1 - वीरांना सलामी

Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board chapter 1 (वीरांना सलामी) include all questions with solution and detail explanation. This will clear students doubts about any question and improve application skills while preparing for board exams. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clear your confusions, if any. OMTEXCLASSES.COM has the Maharashtra State Board Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster.


Further, we at OMTEXCLASSES.COM provide such solutions so that students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and acts as a perfect self-help guidance for students.


Concepts covered in Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board chapter 1 वीरांना सलामी are गद्य (Prose) (12th Standard), व्याकरण (12th Standard).


Using Balbharati 12th Board Exam solutions वीरांना सलामी exercise by students are an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise also page wise. The questions involved in Balbharati Solutions are important questions that can be asked in the final exam. Maximum students of Maharashtra State Board 12th Board Exam prefer Balbharati Textbook Solutions to score more in exam.


Get the free view of chapter 1 वीरांना सलामी 12th Board Exam extra questions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board and can use OMTEXCLASSES.COM to keep it handy for your exam preparation.


Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board

Chapter 1.01: वेगवशता

Chapter 1.02: रोज मातीत

Chapter 1.03: आयुष्य... आनंदाचा उत्सव

Chapter 1.04: रे थांब जरा आषाढघना

Chapter 1.05: वीरांना सलामी

Chapter 1.06: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)

Chapter 1.06: रंग मा झा वेगळा

Chapter 2.07: विंचू चावला...

Chapter 2.08: रेशीमबंध

Chapter 2.09: समुद्र कोंडून पडलाय

Chapter 2.1: दंतकथा

Chapter 2.11: आरशातली स्त्री

Chapter 2.12: जयपूर फूटचे जनक

Chapter 2.12: रंगरेषा व्यंगरेषा

Chapter 3: कथा-साहि त्यप्र कार-परिचय

Chapter 3.01: शोध

Chapter 3.02: गढी

Chapter 4.01: मुलाखत

Chapter 4.02: माहि तीपत्रक

Chapter 4.03: अहवाल

Chapter 4.04: वृत्तलेख

Chapter 5.01: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार

Chapter 5.02: लेखन : निबंधलेखन


HSC Marathi Question Paper 2020 PDF - Std 12th Science, Commerce & Arts - Maharashtra Board

Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board

Author: Balbharati

Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research

Language: Marathi


PDF FILE TO YOUR EMAIL IMMEDIATELY PURCHASE NOTES & PAPER SOLUTION. @ Rs. 50/- each (GST extra)

SUBJECTS

HINDI ENTIRE PAPER SOLUTION

MARATHI PAPER SOLUTION

SSC MATHS I PAPER SOLUTION

SSC MATHS II PAPER SOLUTION

SSC SCIENCE I PAPER SOLUTION

SSC SCIENCE II PAPER SOLUTION

SSC ENGLISH PAPER SOLUTION

SSC & HSC ENGLISH WRITING SKILL

HSC ACCOUNTS NOTES

HSC OCM NOTES

HSC ECONOMICS NOTES

HSC SECRETARIAL PRACTICE NOTES

2019 Board Paper Solution

HSC ENGLISH SET A 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET B 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET C 2019 21st February, 2019

HSC ENGLISH SET D 2019 21st February, 2019

SECRETARIAL PRACTICE (S.P) 2019 25th February, 2019

HSC XII PHYSICS 2019 25th February, 2019

CHEMISTRY XII HSC SOLUTION 27th, February, 2019

OCM PAPER SOLUTION 2019 27th, February, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION COMMERCE, 2nd March, 2019

HSC MATHS PAPER SOLUTION SCIENCE 2nd, March, 2019

SSC ENGLISH STD 10 5TH MARCH, 2019.

HSC XII ACCOUNTS 2019 6th March, 2019

HSC XII BIOLOGY 2019 6TH March, 2019

HSC XII ECONOMICS 9Th March 2019

SSC Maths I March 2019 Solution 10th Standard11th, March, 2019

SSC MATHS II MARCH 2019 SOLUTION 10TH STD.13th March, 2019

SSC SCIENCE I MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 15th March, 2019.

SSC SCIENCE II MARCH 2019 SOLUTION 10TH STD. 18th March, 2019.

SSC SOCIAL SCIENCE I MARCH 2019 SOLUTION20th March, 2019

SSC SOCIAL SCIENCE II MARCH 2019 SOLUTION, 22nd March, 2019

XII CBSE - BOARD - MARCH - 2019 ENGLISH - QP + SOLUTIONS, 2nd March, 2019

HSC Maharashtra Board Papers 2020

(Std 12th English Medium)

HSC ECONOMICS MARCH 2020

HSC OCM MARCH 2020

HSC ACCOUNTS MARCH 2020

HSC S.P. MARCH 2020

HSC ENGLISH MARCH 2020

HSC HINDI MARCH 2020

HSC MARATHI MARCH 2020

HSC MATHS MARCH 2020


SSC Maharashtra Board Papers 2020

(Std 10th English Medium)

English MARCH 2020

HindI MARCH 2020

Hindi (Composite) MARCH 2020

Marathi MARCH 2020

Mathematics (Paper 1) MARCH 2020

Mathematics (Paper 2) MARCH 2020

Sanskrit MARCH 2020

Sanskrit (Composite) MARCH 2020

Science (Paper 1) MARCH 2020

Science (Paper 2)

Geography Model Set 1 2020-2021


MUST REMEMBER THINGS on the day of Exam

Are you prepared? for English Grammar in Board Exam.

Paper Presentation In Board Exam

How to Score Good Marks in SSC Board Exams

Tips To Score More Than 90% Marks In 12th Board Exam

How to write English exams?

How to prepare for board exam when less time is left

How to memorise what you learn for board exam

No. 1 Simple Hack, you can try out, in preparing for Board Exam

How to Study for CBSE Class 10 Board Exams Subject Wise Tips?

JEE Main 2020 Registration Process – Exam Pattern & Important Dates


NEET UG 2020 Registration Process Exam Pattern & Important Dates

How can One Prepare for two Competitive Exams at the same time?

8 Proven Tips to Handle Anxiety before Exams!

BUY FROM PLAY STORE

DOWNLOAD OUR APP

HOW TO PURCHASE OUR NOTES?

S.P. Important Questions For Board Exam 2022

O.C.M. Important Questions for Board Exam. 2022

Economics Important Questions for Board Exam 2022

Chemistry Important Question Bank for board exam 2022

Physics – Section I- Important Question Bank for Maharashtra Board HSC Examination

Physics – Section II – Science- Important Question Bank for Maharashtra Board HSC 2022 Examination

Important-formula



THANKS